न शिकवताच परीक्षा कशी घेता? - उच्च न्यायालय

Delhi-High-Court
Delhi-High-Court

नवी दिल्ली - वर्गच झाले नाहीत तर ऑनलाइन ओपन बुक किंवा घरातूनच परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याला काहीच अर्थ उरत नाही. वर्गांचे आयोजनच करण्यात आले नाही, विद्यार्थ्यांना वर्गात शिकविलेच गेले नाही, तर त्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारे करणार, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) विचारला.

विद्यार्थी काय शिकले याचे मूल्यमापन करणे हा परीक्षांचा उद्देश असतो. प्रत्यक्षात वर्गच घेतले नाहीत तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारे करणार? पुस्तकात जे लिहिलेले आहे, त्याच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणार का, अशी विचारणा न्यायाधीश राजीव शकधर यांनी ‘जेएनयू’कडे केली. पावसाळी सत्रासाठी पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा, तसेच घरी बसून परीक्षा देण्याच्या जेएनयूच्या निर्णयाला विद्यार्थी आणि काही प्राध्यापकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. २०१९च्या पावसाळी सत्राच्या अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीची प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे किंवा ती विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे पाठवून उत्तरपत्रिका ई-मेल किंवा व्हॉट्‌सॲप मेसेजद्वारे मागविण्याचा निर्णय जेएनयूने घेतला आहे. त्यासाठी प्राध्यापकांशी चर्चा केलेली नाही. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com