

while the Central Government assures full support for relief and rehabilitation efforts.
sakal
गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा ६१ वर पोचला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.