'माझं तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही' वाजपेयींनी ममतांना कसं मनवलं; जाणून घ्या किस्सा?

ममता या भाजपचा कट्टर विरोध करत असल्या तरी त्या कधीकाळी एनडीए सरकारमध्ये मंत्री देखील राहिल्या आहेत.
atal bihari Vajpayee
atal bihari Vajpayee

नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. भारतीय इतिहासात सर्वाधिक यशस्वी राजकीय महिला नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. ममता या कधीकाळी काँग्रेसमध्ये होत्या. पण, त्यांनी 'एकला चलो'चा नारा दिला अन् १९९८ मध्ये स्वत:चा पक्ष काढला. त्यांचा निर्णय योग्य ठरला असं म्हणता येईल. ममता या भाजपचा कट्टर विरोध करत असल्या तरी त्या कधीकाळी एनडीए सरकारमध्ये मंत्री देखील राहिल्या आहेत.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ममता यांच्यामध्ये चांगले संबंध होते. एनडीए सरकारमध्ये ममता वारंवार नाराज व्हायच्या. तेव्या वाजपेयी आपल्या मायाळू स्वभावाने त्यांची समजूत काढायचे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, मंत्रिमंडळातील स्थान यावरुन त्या एनडीएमध्ये नाराज होत्या. एकदा त्यांची समजूत काढण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस कोलकात्याला गेले होते. पण, ममता काही त्यांना भेटल्या नाहीत.

atal bihari Vajpayee
Pankaj Tripathi : सध्याचे राजकारणी अन् अटल बिहारी वाजपेयी यांच्यात खूपच अंतर! ते तर...पंकज त्रिपाठीला काय म्हणायचंय?

अटल बिहारी वाजपेयी देखील एकदा कोलकातामध्ये ममतांच्या घरी गेले होते. पण, ममता आपल्या घरी नव्हत्या. वाजपेयींनी ममतांच्या आईची भेट घेतली. त्यांचे चरणस्पर्श केले आणि म्हटलं की तुमची मुलगी खूप हट्टी आहे. खूप सतावते. यानंतर ममता यांचा राग काही मिनिटात कमी झाला होता.

रंजक किस्सा

वाजपेयींनी एकदा तर ममतांना सांगितलं होतं की, तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी जेवणारच नाही. २००१ मध्ये तहलका मॅगझीनने कारगिल शहिदांच्या शवपेट्या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री होते. ममतांनी त्यांना राजीनामा मागितला होता. फर्नांडिंस यांना राजीनामा द्यावा लागला. पण, ममतांचे यावर समाधान झाले नाही. १७ दिवस रेल्वेमंत्री राहिल्यानंतर ममतांनी देखील राजीनामा दिला. त्या एनडीएतून बाहेर पडल्या.

atal bihari Vajpayee
ममतांचा अफाट राग, वाजपेयींच्या टेबलवर ठेवली मानवी हाडे अन् कवटी; काय आहे किस्सा?

वाजपेयींनी ममतांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. ममतांनी याला नकार दिला. मंत्रीपद घेऊ नका पण सरकारचा भाग तर रहा असं वाजपेयींनी त्यांना म्हटलं. पण, ममतांनी ऐकलं नाही. वाजपेयींनी देखील हट्ट केला, की जोपर्यंत त्या मंत्रिमंडळात सहभागी होत नाहीत तोपर्यंत ते उपाशी राहतील. ममता काहीही ऐकायला तयार नव्हत्या. वाजपेयी तीन तास उपाशी राहिले. शेवटी ममतांनी नमतं घेतलं आणि त्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्या. ममतांनीच एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com