भारत-चीनमध्ये चर्चेची सातवी फेरी; चिनी सैनिकांच्या संपूर्ण माघारीवर भारत ठाम 

भारत-चीनमध्ये चर्चेची सातवी फेरी; चिनी सैनिकांच्या संपूर्ण माघारीवर भारत ठाम 

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यात लष्करी पातळीवरील चर्चेच्या सातव्या फेरीस सुरवात झाली. गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर दोन्ही देशाच्या पूर्व लडाख सीमेवर तणाव असून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूर्व लडाखच्या संघर्षाच्या ठिकाणाहून चिनी सैनिकांनी लवकरात लवकर संपूर्णपणे माघार घ्यावी या मुदद्यावर भारत ठाम आहे. ही चर्चा लडाखच्या प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील (एलएसी) चुशूल येथे सुरू आहे. 

पूर्व लडाखमधील सर्व संघर्षाच्या ठिकाणाहून सैनिकांची माघार घेण्याबाबत शेवटचा आरखडा तयार करणे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. आज दुपारी बाराच्या सुमारास चुशूल येथे बैठक सुरवात झाली. भारताचे नेतृत्व लेह येथील १४ व्या कोअरचे कमांडर लेप्टनंट जनरल हरिंदर सिंग करत असून लेप्टनंट जनरल पी.जी.के.मेनन,संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांचाही भारताच्या शिष्टमंडळात समावेश होता. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनने आपापल्या बाजूने सुमारे १ लाख सैनिक तैनात केले असून या तणावावर दोन्ही बाजूंनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान, चीन अभ्यास गट (सीएजी) च्या आघाडीच्या मंत्र्यांनी आणि सैनिक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पूर्व लडाखच्या स्थितीचा आढावा घेतला होता. या आढाव्यानंतर सोमवारी मांडण्यात येणाऱ्या संभाव्य मुद्द्यावर विचार करण्यात आला. चीन अभ्यास गटात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्याव्यतिरिक्त तिन्ही दलाचे प्रमुखांचा समावेश आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माघारीची प्रक्रिया एकाचवेळी 
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत चीनकडून प्यॉंगयॉंग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील मोक्याच्या ठिकाणावरून भारताने सैनिक मागे घ्यावे, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यास भारत विरोध करेल. भारताच्या मते, संघर्षाच्या ठिकाणाहून सैन्य माघारीची प्रक्रिया एकाचवेळी सुरू करणे आवश्‍यक आहे. संघर्षाच्या ठिकाणाहून सैनिकांची संपूर्णपणे माघार यावर भारताचा जोर राहिल, अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान २१ सप्टेंबरच्या चर्चेत दोन्ही बाजूंनी काही निर्णय घेण्यात आले होते. त्यात आघाडीच्या ठिकाणावर जादा कुमक न पाठवणे, एकतर्फी निर्णय न घेणे, स्थिती सामान्य ठेवणे या गोष्टींचा समावेश होता. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com