
Act of War: भारतात आजवर पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्याला भारतानं प्रत्येकवेळी सडोतोड उत्तर दिलं आहे, पण भारताना अनेकदा मोठं नुकसानही सोसावं लागलं आहे. तरीही आजवर दहशतवादी हल्ल्याला एक समस्या म्हणून गणलं जात होतं. पण आता असं होणार नाही.
कारण यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातील 'अॅक्ट ऑफ वॉर' म्हणून गणला जाईल आणि त्याचं पातळीवर त्याला प्रत्युत्तरही दिलं जाईल, अशी भूमिका भारतानं घेतली आहे.