

image showing reduced cloud cover over India as monsoon weakens due to Pacific cyclone influence
esakal
गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पावसाचे प्रमाण अचानक घटले आहे. ११ जुलैच्या उपग्रह छायाचित्रांनुसार, भारताच्या सुमारे ७० ते ८० टक्के भागात पावसाचे ढग दिसले नाहीत. ९ जुलैपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सूनने) संपूर्ण देश व्यापला असतानाही ही स्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे पश्चिम पॅसिफिक महासागरात तयार झालेले शक्तिशाली चक्रीवादळ कारणीभूत आहे. या चक्रीवादळाने बाष्पयुक्त वारे आणि ओलावा स्वतःकडे खेचल्याने भारतीय मॉन्सून तात्पुरता कमकुवत झाला आहे.