
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका आणि चर्चांना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या भेटीत देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि पाकिस्तानच्या हालचालींचा आढावा घेण्यात आला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत सीमा सुरक्षा आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी असलेल्या तयारीवर मंथन झाले. लष्कराच्या तिन्ही शाखांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.