
काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवेदनशील मुद्दा आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या देशाने या विषयात हस्तक्षेप करणे योग्य आहे का? हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शिमला करारानुसार, काश्मीर प्रश्नावर केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते. यात तिसऱ्या देशाला नाक घालण्याची गरज नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. विशेषत: दोन्ही देशांचे पंतप्रधान उपलब्ध असताना अमेरिकेसारख्या देशाची मध्यस्थी का घ्यावी, असा सवाल त्यांनी केला.