AI Impact Summit
sakal
देश
AI Responsibility Campaign : ‘एआय’च्या जबाबदार वापरासाठी भारतीय कटिबद्ध; २४ तासांत २,५०,९४६ जणांची प्रतिज्ञा, ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
भारताने २४ तासांमध्ये एआय जबाबदारी मोहिमेसाठी सर्वाधिक प्रतिज्ञा घेण्याची नोंद केली असून, त्याची नोंद ‘गिनेस बुक’मध्ये करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - भारताने २४ तासांमध्ये एआय जबाबदारी मोहिमेसाठी सर्वाधिक प्रतिज्ञा घेण्याची नोंद केली असून, त्याची नोंद ‘गिनेस बुक’मध्ये करण्यात आली आहे. १६ ते १७ फेब्रुवारी दरम्यानच्या २४ तासांच्या कालावधीत तब्बल २,५०,९४६ जणांनी प्रतिज्ञा केली आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी जाहीर केले.
