शांततेसाठी आधी करार पाळा; भारताने पुन्हा चीनला सुनावले 

india-china
india-china

नवी दिल्ली - सीमेवरील तणावानंतर सैन्य माघारीवर मतैक्य होऊनही प्रत्यक्ष माघारीच्या प्रक्रियेला लागणारा विलंब पाहता भारत आणि चीननेही आता नरमाईचा सूर लावला आहे. सीमावादावर उभयमान्य तोडगा काढण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर यापुढेही वाटाघाटी सुरू राहतील, असे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र सरहद्दीवर शांतता राखण्यासाठी चीनने द्विपक्षीय कराराचे पालन करावे, असा सूचक इशाराही भारताकडून देण्यात आला आहे.

लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग आणि चिनी लष्करी अधिकारी मेजर जनरल लिउ लियान यांच्यात सोमवारी (३० जून) चुशूल येथे झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील बैठकीत बारा तास वाटाघाटी होऊनही ठोस निष्कर्ष निघाला नाही. मात्र सैन्य माघारीची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने विविध टप्प्यांमध्ये परंतु वेगाने सैन्यदलांना माघारी बोलावले जावे यावर मतैक्य झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भविष्यातही उभयमान्य प्रक्रियेच्या चौकटीत सीमावाद सोडविण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटीची प्रक्रिया यापुढेही सुरू राहील असे सांगितले. 

चर्चेची बांधीलकी 
भारत आणि चीन दरम्यान झालेल्या ताज्या चर्चेचा संदर्भ देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्रीवास्त म्हणाले की ‘‘ सोमवारी लष्करी अधिकाऱ्याच्या चर्चेमध्ये ताबारेषेवरील सैन्य माघारी घेणे आणि सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती झाली. त्यात विविध टप्प्यांवर परंतु तातडीने सैन्याची माघारी व्हावी यावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला. या वाटाघाटीत दोन्ही पक्षांच्या बाजू ताबा रेषेवरील तणाव कमी करण्यासाठीची बांधीलकी दर्शविणाऱ्या असून 30 जूनलाच सीमावादावरील तोडग्यासाठी डब्ल्यूएमसीसी समितीचीही बैठक झाली. या व्यतिरिक्त राजनैतिक पातळीवरही समांतर बोलणी सुरू आहे. यापुढेही लष्करी आणि राजनैतिक पातळीवर तसेच डब्ल्यूएमसीसीच्या चौकटीत सीमावादावर उभयमान्य तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू राहतील.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संरक्षणमंत्र्यांचा लडाख दौरा स्थगित 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा लडाख दौरा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. याबाबतचे कारण सरकारने जाहीर केले नसले तरी तणाव निवळण्यासाठी गतिमान झालेले प्रयत्न पाहता भारताने संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत आस्ते कदम धोरण स्वीकारल्याचे संकेत मिळत आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या समवेत लडाखमध्ये ताबारेषेवर भारतीय सैन्यदलांच्या सुसज्जतेची पाहणी करायला तसेच जखमी भारतीय जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संरक्षण मंत्री लेह येथेही जाणार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com