पँगाँग त्सो जवळ महत्त्वाच्या शिखरांवर भारताचा ताबा; ‘फिंगर-४’ माऱ्याच्या टप्प्यात

india china border
india china border

नवी दिल्ली - भारतीय जवानांनी व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या पँगाँग त्सो सरोवराच्या उत्तरेकडील महत्त्वाच्या शिखरांवर ताबा मिळविला आहे. या शिखरांवरून फिंगर ४ वरील चिनी सैन्यावर नजर ठेवता येणे शक्य आहे. या मोहिमेमुळे सरोवराच्या दोन्ही बाजूंना भारतीय जवान मोक्याच्या जागी आले असून भारताची बाजू वरचढ झाली आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील शिखरे ताब्यात घेण्याची कारवाई सुरु असतानाच ऑगस्टअखेरीस सरोवराच्या उत्तरेकडील ही मोहिमही राबविण्यात आली, असे ‘एएनआय’ने म्हटले आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवरानजीक चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीनंतर भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक मार्गाने चर्चा सुरू असतानाच सीमेवरही डावपेच सुरू आहेत. यामध्ये भारतीय जवानांनी अत्यंत गोपनीय मोहीम राबवीत सरोवराच्या दक्षिण भागाचा ताबा मिळवितानाच उत्तर भागात असलेल्या मोक्याच्या पर्वतशिखरांवरही ताबा मिळविला आहे.
 

पर्वतीय भागातील युद्धात उंचावरील ठिकाणांचा ताबा ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. तो ताबा भारताने मिळविला असल्याने चीनने सरोवराच्या उत्तर किनाऱ्याजवळ सैन्य वाढविण्यास सुरवात केली असून ते भारतीय जवानांच्या अधिकाधिक जवळ येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी चीनने सीमेवर १५ ते २० रणगाडे आणून ठेवल्याचे वृत्त आहे. भारतानेही येथे रणगाडे सज्ज ठेवले आहेत. दोन्ही बाजूंकडील सैन्यक्षमताही सध्या समान असल्याचे सांगितले जाते. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभाग घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असले तरी भारताने त्यांचे प्रयत्न फोल ठरविले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com