ISRO Space Mission : भारताचे २०४० पर्यंत चांद्रभूमीवर पाऊल, ‘इस्रो’चा निर्धार; अवकाशस्थानकाच्या उभारणीला वेग

ISRO's Ambitious Target: Man on Moon by 2040 : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी २०२७ मध्ये 'गगनयान' आणि २०४० पर्यंत चांद्रभूमीवर मानव उतरवण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, २०३५ पर्यंत 'भारतीय अंतराळ स्थानक' उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती दिली आहे.
ISRO Space Mission : भारताचे २०४० पर्यंत चांद्रभूमीवर पाऊल, ‘इस्रो’चा निर्धार; अवकाशस्थानकाच्या उभारणीला वेग
Updated on

रांची : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २०४० पर्यंत चांद्रभूमीवर मानव उतरविण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून त्याहीआधी २०२७ मध्ये ‘गगनयान’ ही मानवाचा समावेश असलेली मोहीम आखण्यात आली असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. येथील ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या ३५ व्या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. अवकाश स्थानकाच्या उभारणीच्या अनुषंगाने देखील वेगाने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘इस्रो’कडून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू असून अनेक मोठ्या सुधारणाही घडवून आणल्या जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com