जयपूर : भरधाव पिकअप व्हॅनने रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिल्याने अकरा जण जागीच ठार झाले. ही घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मनोहरपूर महामार्गावर बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. .मृत व्यक्ती उत्तर प्रदेशातील असून मृतांत सात मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. तसेच ८ जण जखमी झाले. खाटू श्याम आणि सालासर बालाजी मंदिराचे दर्शन घेऊन उत्तर प्रदेशकडे परतणाऱ्या भाविकांची पिकअप व्हॅन अपघातग्रस्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले..जखमींना नजिकच्या रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनचा अपघात पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास झाला. प्रवासी गावी उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याकडे जात होते. पिकअप व्हॅनमध्ये २० प्रवासी होते. चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाला असावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.