

जयपूरमध्ये एलपीजी आणि सीएनजी टँकरची धडक होऊन झालेल्या भीषण अग्नितांडवात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आणखी दोघांची प्राणज्योत मालवली. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा १७ वर पोहोचल्याचं सांगितलं. अद्याप या अग्नितांडवात होरपळलेल्या १६ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.