Jallianwala Bagh Massacre 107 Years
esakal
Jallianwala Bagh: जालियनवाला बाग हत्याकांडाला आज १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या घटनेची वेदना आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहे. शहीदांना अभिवादन करण्यासाठी स्मारकात येणारे लोक अंतर्मुख होऊन शांततेत त्या जागेकडे पाहतात. भिंतींवरचे गोळीबाराचे ठसे आणि जीव वाचवण्यासाठी लोकांनी उडी घेतलेला विहीर हा ब्रिटिश क्रौर्याचा जिवंत पुरावा आहे. मात्र, या बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी ऊर्जा दिली.