

Jan Vishwas Abhiyan
esakal
मध्य प्रदेशातील प्रशासकीय व्यवस्था अधिक पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी छिंदवाडा येथून ‘जन-विश्वास अभियान’ सुरू केले. या अभियानाच्या सुरुवातीलाच नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आरोग्य आणि महसूल विभागातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणाविरोधात सरकारची कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे.