Kailash Vijayvargiya and Nitish Kumar News नवी दिल्ली : महाआघाडीसोबत हातमिळवणी करून बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भाजप नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी खिल्ली उडवली आहे. नितीश कुमार यांनी जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा आपण विदेशात होतो. विदेशात मुली जसे प्रियकर बदलतात, तसे आमच्याकडे नितीश कुमार सरकार बदलतात, असा टोला विजयवर्गीय यांनी लगावला.
बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटले आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि तेजस्वी यादव यांच्या राजद आणि काँग्रेस पक्षासोबत बिहारमध्ये नवे सरकार स्थापन केले.
दुसरीकडे, बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा जंगलराजचा दावा करणाऱ्या नेत्यांपैकी एक कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमारांवर मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून राजकारण तापू शकते.
इंदूरला पोहोचलेले कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) म्हणाले, ज्या दिवशी बिहारचे सरकार बदलले, त्या दिवशी मी परदेशात होतो. एकाने सांगितले की आमच्या बाबतीत असेच होते. मुली केव्हाही प्रियकर बदलतात. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचीही हीच स्थिती आहे. कधी कोणाशी हस्तांदोलन करेल, कधी कोणाचे हात सोडेल, सांगता येत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.