Karnataka Congress Crisis
esakal
बंगळूर : काँग्रेसमधील नेतृत्व बदलाचा संघर्ष (Karnataka Congress Crisis) कोणत्याही क्षणी भडकू शकणारा ज्वालामुखी ठरला असताना, परिस्थिती अचानक शांत झाल्यासारखी दिसत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांच्या नाश्त्याच्या बैठकीनंतर दोन्ही गटांनी एकतेचा संदेश दिला; मात्र या शांततेमागे खोलवर राजकीय गणित दडलेले आहे. सत्ता वाटपातील गोंधळ खरोखर संपला आहे का की, हा फक्त तात्पुरता तह आहे? पडद्यामागे काय घडत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.