...म्हणून 'CAA' आवश्यक होता; केंद्रीय मंत्र्याचं अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य

सध्या अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानं तिथं अनागोंदी माजली आहे.
Afganistan
Afganistan

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती पाहता मोदी सरकारनं आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कसा गरजेचा होता, हे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितलं आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आपल्या शेजारील देश अफगाणिस्तानात अस्थिर परिस्थिती झाली आहे. इथल्या शीख आणि हिंदू एका भयानक परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळेच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करणं नेमकं का आवश्यक होतं? हे कळेल"

काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा?

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA मध्ये भारताच्या शेजारील देशांतील (अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका) हिंदू, बौद्ध, जैन, पारसी, शीख आणि ख्रिश्चन धर्मातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत पूर्वीच्या कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला भारताची नागरिकता देण्यासाठी कमीत कमी ११ वर्षे भारतात राहणे आवश्यक आहे. पण या कायद्यात सुधारणा करत ही मर्यादा ११ वर्षांवरुन कमी करत सहा वर्षे करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com