काश्मीरमधील आमदार जनतेतूनच निवडणार : मोदी

काश्मीरमधील आमदार जनतेतूनच निवडणार : मोदी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील नागरिकांना मला सांगायचे आहे, की यापुढेही तुमचा आमदार, मुख्यमंत्री हा जनतेतूनच निवडण्यात येईल. आपल्याला काश्मीरमधून दहशतवाद, फुटीरतावाद हटवायचा आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काश्मीरमधील हे कलम हटविण्यात आले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत. देशभरात सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मोदींनी याविषयी प्रथमच सार्वजनिक भाषण करत देशाला उद्देशून भाषण केले.

मोदी म्हणाले, की जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केले असले तरी तुमचा लोकप्रतिनिधी हा जनतेतूनच निवडला जाईल. लवकरच निवडणुका होतील आणि युवकांना विधानसभेत जाण्याची संधी मिळेल. पारदर्शक वातावरणात तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडता येतील.

पंचायती निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुका घेण्यात येतील. लडाखमध्ये परिस्थिती वेगळी असेल. काश्मीरमधील पंचायत निवडणुकीमुळे अनेक विधायक कामे पोचविण्यात यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com