kashmir
sakal
देश
Shrinagar News : काश्मीर खोऱ्यात जलाशय कोरडे; पावसाचा अभावामुळे जलस्रोत, नद्यांची पातळी घटली
काश्मीरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळामुळे अनेक प्रमुख जलाशय कोरडे पडले असून, विविध भागांत पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
श्रीनगर - काश्मीरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या दुष्काळामुळे अनेक प्रमुख जलाशय कोरडे पडले असून, विविध भागांत पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. संपूर्ण खोऱ्यात थंडीची तीव्र लाट आहे.
दरम्यान, हवेतील प्रदूषण वाढल्याच्या बातम्यांनी नागरिकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. श्रीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी उणे पान अंश तापमान नोंदवले गेले, तर लडाखला काश्मीरशी जोडणाऱ्या झोजिलादरम्यान किमान तापमान उणे १५ अंश होते.
