

अहमदाबाद : काँग्रेसने संघटनात्मक बदलासाठी कठोर निर्णयांचे स्पष्ट संकेत अधिवेशनातून दिले. "जे पक्ष कार्यात हातभार लावत नाहीत त्यांनी आता विश्रांती घ्यावी. काम करणार नसाल तर निवृत्त व्हा", असा सज्जड दम काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निष्क्रिय नेत्यांना भरला. या वेळी खर्गे यांनी महाराष्ट्रातील निवडणूक फ्रॉड (गैरप्रकार) आहे आणि हा गैरप्रकार लोकशाही उध्वस्त करणारा आहे, असा खळबळजनक आरोपही केला.