जयपूर : राजस्थानमधील भाजपचे नेते व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री किरोडीलाल मीणा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला राज्यातून अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मीणा यांच्यावर राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली होती, ‘‘या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन,’’ असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मीणा राजीनामा दिला. मीणा यांच्याकडे कृषी, ग्रामविकास, आपत्ती व्यवस्थापन या खात्यांची जबाबादारी आहे.
मीणा यांनी दहा दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे राजीनामा पाठविला असल्याचे त्यांच्या साहाय्यकांनी सांगिले. मीणा यांनी गुरुवारी ‘एक्स’च्या माध्यमातून रामचरित मानसमधील ‘रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन ना जाई’ ही ओळ पोस्ट केली आहे.
या मतदारसंघांची जबाबदारी
मीणा यांच्यावर एकूण सात मतदारसंघांची जबाबदारी होती या पैकी दौसा, भरतपूर, करौली धोलपूर आणि टोंक सवाई माधोपूर या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला तर भरतपूर, अलवार व कोटा-बुंदी येथे भाजपचा विजय झाला आहे.
मी अन्य कोणत्याही कारणाने राजीनामा देत नाहीये. मी निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते की, माझ्यावर जबाबदारी असलेल्या जागांवर भाजपचा पराभव झाल्यास मी राजीनामा देईन, त्यामुळेच मी राजीनामा दिला. मी माझ्या मूल्यांवर ठाम आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र त्यांनी अत्यंत आदरपूर्वक तो नाकारला आहे.
-किरोडीलाल मीणा, भाजपचे आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.