नवी दिल्लीः सध्या देशातल्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेचा उच्चांक पहावयास मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये उष्णतेने मागच्या पन्नास वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. अलीपूर वेधशाळेने तापमानाची नोंद घेतली आहे.
मंगळवारी कोलकाता येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. अलीपूर वेधशाळेने मागच्या ५० वर्षांतील सर्वोच्च तापमान नोंदवले असून हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे. रविवारपासून तापमानात घट होईल, अशी माहिती देत पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोलकाला येथील सॉल्टलेक परिसरामध्ये ४३.५ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बराकपूरमध्ये ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यासह पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे राज्यातील सर्वाधिक तापमान ४७.२ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले.
पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील पनागढ येथे ४५.६ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले असून मेदिनीपूर शहर 45.5 डिग्री सेल्सिअसच्या खाली होते. तर बांकुरा येथे 45.1 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.
बंगळूरुमध्ये कसं आहे हवामान?
कोलकातापाठोपाठ बंगळूरु येथेही तापमानाने उच्चांक गाठला आहे. येथेही तापमानाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी, बंगळुरूमध्ये ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एवढे तापसमान मागच्या पन्नास वर्षांत केवळ दुसऱ्यांदा नोंदवले गेलेले आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रेड अलर्ट जारी केलाय. उच्च तापमान 2 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही विभागाने केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.