केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलानाला आता एक वर्ष पुर्ण झालं असून, हे आंदोलन आता उत्तर प्रदेशमध्ये देखील तीव्र रुप धारण करताना दिसतंय. त्यातच आज उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमध्ये झालेल्या संघर्षात ४ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर कार घातली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकरी जखमी झाले आहे. शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केला असून, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.