नवी दिल्ली: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (lakhimpur kheri violence) आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. "लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला, त्या ठिकाणी माझा मुलगा आशिष हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन" असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay mishra) यांनी सांगितले.
"लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला त्या ठिकाणी माझा मुलगा हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन" असे अजय मिश्रा इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले. रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. ज्यात चार शेतकरी आहेत. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य तिकुनिया येथे आले होते. त्यावेळी हा हिंसाचार झाला. तिकुनिया अजय मिश्रा यांच्या पूर्वजांचे गाव आहे. आंदोलकांनी ताफ्यावर हल्ला केला. त्यात ड्रायव्हर आणि तिघांची हत्या केली, असा दावा अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाने केला आहे. या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.