court
Esakal
दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सत्तेच्या बळावर मनमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर शब्दांत टिप्पणी करत, कायद्याच्या राज्यात कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नसल्याचे स्पष्ट केले आहे. "कायद्याच्या राज्याला 'सिंघम' किंवा 'पुष्पा' यांपैकी कोणाचीही गरज नाही," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने लोकप्रतिनिधींनी शस्त्रांचे प्रदर्शन करणे समाजासाठी चुकीचा संदेश असल्याचे म्हटले आहे.