Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

Loksabha election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना प्रचारादरम्यान एक वेगळाच अनुभव आला. थेट लोकांनीच त्यांना लग्न कधी करणार, असं विचारलं. त्यावर राहुल यांनीही तितक्याच मोकळेपणाने उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे रायबरेलीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. सोमवारी ते पुन्हा रॅलीसाठी रायबरेलीमध्ये दाखल झाले होते. जेव्हा राहुल गांधींचं संबोधन संपलं तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांना जोरजोरात प्रश्न विचारणं सुरु केलं.

गर्दीने एकच प्रश्न वारंवार उपस्थित केला. 'तुम्ही लग्न कधी करणार?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता. त्यावर राहुल गांधींनी जवळच्या लोकांना विचारलं, की लोक काय विचारत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं. ''आता लवकरच लग्न करावं लागेल'' या त्यांच्या उत्तराने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?
China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

दरम्यान, केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघांमधून उभे आहेत. त्यांच्या वायनाडच्या जागेवर आधीच मतदान पार पडलं आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातूनही ते उमेदवार आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com