Lok Sabha Election Result : विरोधात बसणार की सत्ता स्थापन करणार? निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi On Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Lok Sabha Elections Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९४ जागांवर आघाडी मिळाली असून इंडिया आघाडीचे २३१ जागांवर आणि १८ जागांवर इतर पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. यादरम्यान निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका जाहीर केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सत्ता स्थापनेच्या शक्यतेवर देखील भाष्य केलं.

एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे, पण एनडीएमधील टीडीपी आणि जेडीयू यापुर्वी तुमच्यासोबतही राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे की, अजूनही सत्ता स्थापनेची शक्यता आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या इंडिया आघाडीमधील सहकाऱ्यासोबत बैठक घेणार आहोत. ही बैठक उद्या होईल आणि या प्रश्नाचे उत्तर त्या बैठकीत दिले जाईल. आम्ही आमच्या घटक पक्षांचा आदर करतो, त्यामुळे त्यांची मते घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही घोषणा करणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पुढील निर्णय उद्या इंडिया आघाडीची बैठकीत होईल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी आम्ही एका आघाडीचा भाग आहोत, इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाहीये. निकालानंतर पाच तारखेला आमची बैठक होईल असं ठरलं आहे. त्या बैठकीत आम्ही विरोधात बसणार की सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार हे ठरवू असे पुन्हा राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi
Nashik Constituency Lok Sabha Election Result : नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे किंग! ठाकरे गटाने गोडसेंना दाखवलं अस्मान

ही निवडणुक इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांनी फक्त एका पक्षाविरोधात लढली नव्हती , ही निवडणूक आम्ही भाजप- एक राजकीय पक्ष, भारताचे इंस्टीट्यूशन्स, सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्था यांच्याविरोधात लढलो होतो. कारण या सर्वांना नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ताब्यात घेतलं, धमकावलं होतं. ही लढाई संविधान वाचवण्याची होती. यांनी बँक खाती गोठवली, मुख्यमंत्र्यांना जेल मध्ये टाकले, तेव्हा माझ्या मनात होतं की जनता आपल्या संविधानासाठी लढेल आणि हे खरं ठरलं. मी भारतातील जनतेचे, इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे आभार मानतो. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी पहिलं पाऊल उचललं आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com