मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितलं की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर, देशातील नागरिकांना आंबेडकर जयंती आणि इतर कोणतेही स्थानिक धार्मिक सण एकाच वेळी साजरे करता आले पाहिजेत.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने नागापट्टिनम जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येची भीती दाखवून प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी करणारी याचिका फेटाळताना हे निरीक्षण नोंदवलं आहे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांनंतरही आपण आंबेडकरांची जयंती एकाच वेळी गावात मंदिरात उत्सव सुरू असताना साजरी करू शकत नाही, तर लोक आपल्या देशाबद्दल काय विचार करतील?, असं म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली.
याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितलं की पट्टावर्ती गावातील अनुसूचित जाती समुदायाने नागपट्टिनम येथील स्थानिक बसस्थानकावर आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्याच दिवशी गावात मंदिर उत्सव साजरा केला जात होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये संघर्ष झाला होता.
शुक्रवारी आंबेडकर जयंतीनिमित्त असाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. अशाप्रकारे, त्यांनी प्रार्थना केली की या परिसरात कोणत्याही मोठ्या मेळाव्यास मनाई करण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात यावे. मात्र, पोलीस पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी स्थानिक पोलिसांना तोंडी निर्देश दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.