Narmada Project
sakal
नवी दिल्ली - नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याचे दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, यासंदर्भातील तब्बल पंधरा वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय झाला.