मैत्री सेतूमुळे भारत आणि बांगलादेशचे संबंध आणखी दृढ होतील – पंतप्रधान

Narendra Modi
Narendra Modi

भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान उभारण्यात आलेल्या फेनी नदीवरील ‘मैत्री सेतू’ पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केलं. या पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ‘मैत्री सेतू’ या पुलासह मोदी यांनी मंगळवारी त्रिपुरामधील काही विकासकामांचे उद्घाटन केलं तसेच त्यांनी अनेक विकासकामाचं भूमिपूजनही करण्यात आलं. 
 
मंगळवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैत्री सेतू’ पुलाचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते म्हणाले की, मैत्री सेतू सुरु झाल्यामुळे अगरतला, अंतरराष्ट्रीय समुद्री बंदरगाहपासून सर्वात जवळील शहर झालं आहे. या पुलामुळे भारत आणि बांगलादेशमधील दळणवळण अधिक सुकर होणार आहे.

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना या ही या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फ्रन्सच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळानं १३३ कोटी रुपये खर्चून हा सुमारे १.९ किलोमीटर लांबीचा सेतू उभारला आहे.

भारतातील सबरूम आणि बांगलादेशमधील रामगढ दरम्यान हा सेतू उभारण्यात आला आहे. यामुळे त्रिपुरा हे भारताचं ईशान्येकडील प्रवेशद्वार म्हणून भरभराटीस येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com