नवी दिल्ली : महाराष्ट्रात ज्या प्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आला आहे, त्या धर्तीवर केंद्र सरकारने लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून वाचविण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत केली.
आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हाथरसच्या मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते खर्गे म्हणाले, ‘‘कुणी भोंदू बाबा लोकांना जमा करतो. त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था राहत नाही. त्यामुळे अनेकदा निरपराध लोकांना जीव गमवावा लागतो. हाथरसमधील घटना हे त्याचेच उदाहरण आहे. अनेक भोंदू बाबा तर आज तुरुंगात आहेत. या भोंदू बाबांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला आहे. या धर्तीवर केंद्र सरकारने कायदा करून लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून वाचवावे’’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांना आज राज्यसभेत मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. अशा घटना घडू नये, यासाठी केंद्र सरकारने उपाययोना कराव्या, असे निर्देशही सभापती धनखड यांनी केंद्र सरकारला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील भाषणानंतर संसदेचे विशेष अधिवेशन संस्थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाज मंगळवारला संपविण्यात आले. परंतु राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर आज राज्यसभेत झाल्यानंतर त्यानंतर हे अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याची घोषणा सभापती जगदीप धनखड यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.