ममतांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा

ममतांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (TMC Mamata Banerjee ) यांनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शपथ (Chief Minister of West Bengal) घेतली. राज्यपाल जगदीप धनखड (Governor Jagdeep Dhankhar) यांनी ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी पराभव करून तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा निर्विवाद यश मिळवले. दोन मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये तृणमूल काँग्रेसनं 200 पेक्षा जास्त जागांवर वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. (Mamata Banerjee takes oath as the Chief Minister of West Bengal for a third consecutive term) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी ट्विट करत ममतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

२९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर दणदणीत विजय मिळवळा आहे. तृणमूलची २०२१ च्या निवडणुकीतील कामगिरी २०१६ च्या कामगिरीपेक्षा सरस ठरली आहे. २०१६ मध्ये तृणमूलला २११ जागा मिळाल्या होत्या. तसेच या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या भाजपला ७७ जागा मिळाल्या आहेत.

ममतांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदींनी दिल्या शुभेच्छा
West Bengal Election 2021: ममता-मोदींच्या 'फाइट'वर भन्नाट मीम्स व्हायरल

पराभवानंतरही ममता मुख्यमंत्री कशा?

पश्चिम बंगालच्या विधानसभा (West Bengal Assembly Election 2021) निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) बहुमत मिळवलं पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना नंदीग्राममध्ये (Nandigram) पराभवाचा धक्का बसला. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी 1700 हून अधिक मतांनी विजय मिळवला. राज्यात सत्ता मिळाली असली तर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानं मुख्यमंत्रीपदाचं काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. राज्यात विधानपरिषद नसल्यानं आता पुढे काय याची उत्सुकता सर्वांनाच लागली. कलम 164 नुसार एखादा मंत्री सलग सहा महिन्यांपर्यंत जर कोणत्या राज्याच्या विधानमंडळात नसेल तर तो मंत्री पदावर राहू शकत नाही. याचाच अर्थ ममता बॅनर्जींकडे आता सहा महिन्यांचा कालावधी आहे. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्यानं ममता बॅनर्जींना रिकाम्या जागेवरून अर्ज दाखल करावा लागेल आणि पोटनिवडणूक जिंकावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com