Mehbooba Mufti : नागरिकांची सरसकट धरपकड नको: मेहबुबा मुफ्ती, निष्पाप नागरिकांना सोडून द्या

Srinagar : किमान तीन हजारांपेक्षा अधिक जणांना अटक केल्याचे आणि सुमारे शंभराहून अधिक पीएसए कायद्यानुसार कारवाई झाल्याचे कळते. निरपराध व्यक्तींना सोडून द्यावे आणि अन्यायकारक धोरण थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiSakal
Updated on

श्रीनगर : पहलगाम हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही एखाद्या कारवाईसारखी राबविली जात असल्याचा आरोप पीडीपीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला. यासंदर्भात त्यांनी नायब उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार काश्‍मीर खोऱ्यातील अनेकांना अटक केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com