
मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करण्याच्या आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. वीजबंदी करण्याची वेळ आली तर त्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी दिली.