Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Big announcement for farmers : जाणून घ्या, नेमकी काय आहे आनंदाची बातमी? ; देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार फायदा
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan announces new pesticide centres to support farmers across India under Modi government’s latest agricultural initiative.
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan announces new pesticide centres to support farmers across India under Modi government’s latest agricultural initiative. esakal
Updated on

Shivraj Singh Chouhan News : केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्याच्या विचारात आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत नेमकी माहिती दिली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) 96 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विकासित कृषी संकल्प अभियानात मिळालेल्या सूचनांच्या आधारे कृषी विकासाची रणनीती तयार केली जाणार आहे.

तसेच, शिवराज सिंह चौहान यांनी लवकरच जन औषधी केंद्राप्रमाणेच आता शेतकऱ्यांसाठी ‘पीक औषधी केंद्र’ही सुरू केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या उपयुक्ततेवर आणि मागणीवर आधारित संशोधनाच्या गरजेवर भर दिला. बैठकीत ICAR चा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला. तसेच शेतीशी संबंधित चार पुस्तके प्रकाशित करण्यात आली. यावेळी, राज्यांचे कृषी मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित होते. भविष्यात शेती आणि शेतकरी समृद्धीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

निकृष्ट बियाणे, खत, कीटकनाशके आणि खते ही एक गंभीर समस्या आहे, ज्यासाठी सरकार लवकरच कठोर कायदेशीर तरतुदी आणेल. खतांच्या किमतीवरही काम करण्याची गरज आहे. योग्य किंमत निश्चित केली पाहिजे. असंही कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan announces new pesticide centres to support farmers across India under Modi government’s latest agricultural initiative.
Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

शिवराज म्हणाले की, सोयाबीन, डाळी, तेलबियांमध्ये अधिक संशोधन आणि काम करावे लागेल. इतर पिकांसह गहू, तांदूळ आणि मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी काम करावे लागेल. यासाठी राज्यनिहाय आणि पीकनिहाय योजना आखल्या जातील. केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाही याचीही तपासणी केली जाईल.

Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan announces new pesticide centres to support farmers across India under Modi government’s latest agricultural initiative.
Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

याशिवाय, शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेती हा राज्यांचा विषय आहे. केंद्राला त्यांच्यासोबत मिळून काम करावे लागेल. राज्यांच्या सहकार्याशिवाय शेतीला प्रगतीचे प्रयत्न अपूर्ण आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहे. अन्न-धान्यसाठा भरत आहे. एकेकाळी आपण धान्य आयात करायचो. आज आपण निर्यात करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com