Rahul Gandhi
Rahul Gandhi esakal

Rahul Gandhi : आदिवासींचे हक्क मोदी हिरावून घेतील; राहुल गांधी यांचा दावा

घटना वाचविण्यासाठी प्राणत्यागाचीही तयारी

चाईबासा (झारखंड) : पंतप्रधान मोदी यांना आदिवासींचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज झारखंड येथे केला. आदिवासींच्या हक्काचे ‘जल, जंगल आणि जमीन’ हे मोदींना उद्योगपतींच्या हातात द्यायचे आहे, असे राहुल गांधी सभेत बोलताना म्हणाले.

Rahul Gandhi
Jalgaon News : लासूरची ऐतिहासिक ‘साखर बावडी’ वाचविण्याची गरज

राहुल यांनी आज चाईबासा व गुमला येथे प्रचारसभा घेतल्या. ते म्हणाले, ‘‘यंदाची निवडणूक ही राज्यघटना वाचविण्यासाठीची व आदिवासी, गरीब व मागासवर्गीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीची आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची प्राणत्याग करण्याचीही तयारी आहे. आदिवासींच्या हक्काचे जल, जमीन आणि जंगल हे निवडक उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचा मोदींचा विचार आहे. आदिवासींना फक्त घरगड्यांचीच कामे मिळावीत, अशी भाजपची इच्छा आहे. तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील व्हावे, असे त्यांना वाटत नाही. हा देश ९० आयएएस अधिकारी चालवितात, त्यापैकी फक्त एकच जण आदिवासी आहे.’’

‘कोट्यवधींना लखपती बनवू’

राहुल गांधी म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी हे अदानी आणि अंबानींसाठी काम करतात. आम्ही सत्तेत आल्यास कोट्यवधी लोकांना लखपती बनवू. देशातील गरीब कुटुंबांची नोंद करून या कुटुंबातील एका महिलेला वर्षाला एक लाख रुपये देऊ. आरक्षणाची मर्यादाही ५० टक्क्यांच्या वर नेऊ, अग्निवीर योजना रद्द करू व जीएसटी कायद्यात सुधारणा करू’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com