नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काँग्रेस मुक्त करण्याची घोषणा केली होती. परंतु देशातील मतदारांना पंतप्रधान मोदी यांना बहुमत मुक्त केले, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सरकार बहुमताचे नसून अल्पमताचे सरकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतींनी बहुमताचे सरकार असल्याचे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती मूर्मू यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना राष्ट्रपतींनी दही भरविले होते. या संदर्भातील खासदार राऊत यांनी केलेला उल्लेख तालिका सभापती घनश्याम तिवारी यांनी कामकाजातून काढून टाकला. खासदार राऊत यांना तीन मिनिटांचा अवधी दिल्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला. विरोधकांचे आवाज आपण बंद करीत असल्याने संविधान धोक्यात आल्याचा आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.