Mumbai High Court : "घटस्फोट घेताना स्वतःच्या हक्कांपेक्षा मुलांच्या कल्याणाला प्राधान्य द्यावं"

मुलांच्या आरोग्यासाठी आई वडिलांसोबत राहण्याप्रमाणे भावंडांसोबत राहणंही महत्त्वाचं असतं.
Mumbai High Court
Mumbai High CourtSakal

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितलं की, निरोगी वाढीसाठी प्रत्येक मुलाने केवळ त्यांच्या पालकांचाच नव्हे तर त्यांच्या भावंडांचाही सहवास असणे आवश्यक आहे.

न्यायमूर्ती रमेश धानुका आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात सांगितलं की, १५ वर्षांच्या एका मुलाला आपल्या वडिलांना नव्हे तर त्यांच्यासोबत राहणाऱ्या आपल्या भावंडांना भेटण्याची इच्छा आहे.

"आई-वडीलांमधील टोकाच्या वादामुळे, मुलाला त्याच्या वडिलांचा आणि मोठ्या भावंडांचा सहवास मिळण्यापासून वंचित राहावं लागलं. मुलाच्या निरोगी वाढीसाठी, मुलाला त्याच्या आई-वडिलांसह भावंडांचाही सहवास असणं आवश्यक आहे, असा आदेशही या खंडपीठाने दिला आहे.या खंडपीठाने मुलाचे वडील आणि आई यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटलाही लक्षात घेतला. त्यात नमूद करण्यात आलं आहे की, सुरुवातीला मुलाने वडिलांना भेटण्याची इच्छा दर्शवली नाही, पण नंतर झूम कॉलवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

Mumbai High Court
Supreme Court : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

"त्याला आई-वडील दोघांचाही सहवास मिळणे हेच त्याच्या हिताचं आहे. भूतकाळातील दुर्दैवी घटनांमुळे त्याच्या मनातल्या जखमा धुवून निघणं हेही त्याच्या हिताचं आहे. दोन्ही आई-वडील, जे न्यायालयीन लढा लढत आहेत आणि मुलावर त्यांचे अधिकार आणि इच्छा लादण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या स्वत: च्या हक्कांपेक्षा मुलाच्या कल्याणाला प्राधान्य देणं अपेक्षित आहे," असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

Mumbai High Court
Supreme Court : "बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत"; निवृत्त न्यायाधीशांनी सुनावलं!

खंडपीठाने पुढे असं निरीक्षण नोंदवलं की, भारतात वैवाहिक वाद कडवटपणे लढले जातात आणि अशा कटु खटल्यांचे परिणाम मुलांना भोगावे लागतात. "ही एक दुर्दैवी घटना आहे जिथे पालकांमधील वैवाहिक वादामुळे, मुलांना त्रास सहन करावा लागतो. आपल्या देशात, वैवाहिक विवादांमध्ये सर्वात कटुतेने लढले जाणारे वैवाहिक खटले असतात. एक असा टप्पा येतो जेव्हा भांडण करणारं जोडपं मुलांचाही विचार करणं सोडून देतं", असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com