
जयपूरमध्ये मिठाईच्या दुकानांमध्ये काही गोड पदार्थांची नावं बदलण्यात आली आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्यांचं होणारं समर्थन आणि पाकच्या कुरापती यामुळे मिठाईच्या नावातला पाक हा शब्द काढून त्या ऐवजी श्री आणि भारत असे शब्द जोडण्यात आले आहेत. जयपूरमधील अनेक मिठाई दुकानदारांनी ज्या पदार्थांच्या नावात पाक शब्द आहे त्या पदार्थांची नावे बदलली आहेत.