

Narayan Sai divorce case verdict highlights ₹2 crore alimony order by Indore family court after an 8-year legal battle.
esakal
Indore Family Court Announces Landmark Divorce Verdict : मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका कौटुंबिक न्यायालयाने नुकताच एका गाजलेल्या वैवाहिक वादप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई आणि त्याची पत्नी जानकी हरपालानी यांच्यात गेल्या जवळपास आठ वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम देत न्यायालयाने त्यांचे लग्न अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केले.या निकालाला केवळ दोन्ही पक्षांसाठी वैयक्तिक महत्त्वच नाही, तर न्यायालयाने निश्चित केलेली पोटगीची रक्कमही सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.