

नवी दिल्ली : ‘‘महाराष्ट्रात विकासवादाचा, सुशासनाचा आणि खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला असून खोटेपणा, कपट, विभाजनकारी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा अतिशय वाईट पराभव झाला आहे,’’ अशा शब्दांत भाजप-महायुतीच्या महाविजयाचे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. लांगुलचालनाचा सामना कसा करायचा हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले असे मोदींनी सांगितले.