'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय.'
तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय. त्यामुळं आम्ही सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो. खरं तर आमच्या परराष्ट्र धोरणात 'सुरक्षा' ही प्रथम क्रमांकाची प्राथमिकता आहे, असं स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी व्यक्त केलं.
एस जयशंकर यांनी अलीकडंच बाली इथं झालेल्या G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी सीमेचा प्रश्न लवकरात-लवकर सोडवण्यासाठी चर्चा झाल्याचं कळतंय.
2020 मधील गलवान संघर्षानंतर अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. 15 आणि 16 जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी लष्करी कारवाईच्या विरोधात संघर्ष सुरू झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.