...त्यांना कसे उत्तर देऊ; PM मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

narendra modi
narendra modinarendra modi

नवी दिल्ली : भारत-चीन सीमा विवाद आणि संसदेत वाढती बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण न दिल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. यावर जेव्हा जे आवश्यक होते तेव्हा काही विषयांवर बोललो. मी आणि आमचे सरकार कोणावरही हल्ला करीत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी माजी काँग्रेस प्रमुखांवर निशाणा साधला. त्यांनी ‘ऐकत नाही आणि सभागृहात बसत नाही अशी व्यक्ती’ असे संबोधले.

मी संसदेत चर्चेचे स्वागत करतो. मला एखाद्यावर हल्ला करण्याची भाषा माहित नाही आणि ती माझ्यामध्ये नाही. परंतु, तर्क आणि वस्तुस्थितीच्या आधारावर माध्यमांनी कदाचित काही वाद निर्माण करण्यासाठी सभागृहात माझ्या शब्दांचा दुसरा अर्थ लावतात, असेही मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी बेरोजगारी, भारत-चीन या मुद्द्यावर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

narendra modi
हिजाबवर बोलणारी मलाला युसूफझाई ट्रोल; जुना ट्विट होतोय व्हायरल

काँग्रेसच्या आरोपांवर पंतप्रधान उत्तर देत होते. आम्ही कोणावरही हल्ला करीत नाही. आम्ही संवाद साधण्यावर विश्वास ठेवतो. काही वेळा वाद-विवाद होतात. मी त्याचे स्वागत करतो. म्हणूनच या विषयांवर नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. मी प्रत्येक विषयावर तथ्यांच्या आधारे बोललो. काही विषयांवर आमच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणि संरक्षण मंत्रालयाने सविस्तर उत्तरे दिली. जिथे गरज होती तिथे मी बोललो होतो. जो ऐकत नाही आणि सभागृहात बसत नाही अशा व्यक्तीला मी कसे उत्तर देऊ, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या जोरदार हल्ल्याला प्रत्युत्तर दिले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेसला घाबरले असे म्हटले होते. पंतप्रधानांना काँग्रेसची भीती असल्याचे दिसून येते, असे म्हटले होते. २ फेब्रुवारी रोजी लोकसभेत विरोधकांच्या वतीने चर्चेला सुरुवात करताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला होता.

७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे धोरण ‘फोडा आणि राज्य करा’ आहे. ते ‘तुकडे टुकडे’ टोळीचे नेते बनले आहे, असे म्हटले होते. ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसची विचारसरणी ‘शहरी नक्षलवाद्यांनी’ हायजॅक केली आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणी नसती, जातीचे राजकारण नसते, शीखांची कत्तल कधीच झाली नसती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com