
नवी दिल्ली - तृष्टीकरणाचे राजकारण करण्याऐवजी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), कलम ३७० रद्द करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांचे समर्थन करणारे सरकार दिल्लीला हवे आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर निशाणा साधला.
दिल्ली विधासभेची निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना द्वारका येथील आज मोदींच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, दिल्लीला दिशा देणाऱ्या सरकारची गरज आहे, त्यामुळे फक्त दोषारोप करणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून देऊ नका.
दिल्लीच्या बाहेर येथील नागरिक आजारी पडले तर आपच्या सरकारने सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकचा काहीही उपयोग होणार नाही, असा दावा करत आपच्या सरकारने देशाच्या राजधानीत आयुष्यमान भारत योजना लागू केली नाही, असे टीकास्त्र मोदींनी डागले.
आपच्या सरकारने केवळ द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोपही मोदींनी भाषणात केला. पंतप्रधान मोदींची सोमवारीही दिल्लीतील करकरडूमा येथे प्रचार सभा झाली होती.
शत्रूंना आपल्यावर हल्ले करण्याची संधी देणारे सरकार दिल्लीला नको आहे, असे मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.