
नवी दिल्ली: लोकशाही स्वातंत्र्यामध्ये भारताची घसरण होत असल्याचा आंतरराष्ट्रीय रिपोर्ट समोर आला होता. याचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. इराकमध्ये हुकुमशहा सद्दाम हुसैन आणि लीबियाचा मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणूक घ्यायचे आणि जिंकायचे, असं राहुल गांधी म्हणाले. ते मंगळवारी एका कार्यक्रमात बोलत होते. राहुल आपल्या ऑनलाईन संबोधनात म्हणाले की, सद्दाम हुसैन आणि गद्दाफीच्या काळातही निवडणुका व्हायच्या. ते निवडणुका जिंकायचेय. असं नाही की लोक मतदान करायचे नाहीत, पण या मतांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुविधा नव्हती, कोणतीही संस्था अस्तित्वात नव्हती. राहुल यांनी ब्राऊन यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय आणि इतर फॅकल्टी सदस्यांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
निवडणुक म्हणजे लोकांनी मतदान केंद्रावर जाणे आणि बटण दाबणे असा होत नाही. निवडणूक एक प्रक्रिया आहे, निवडणूक एक संस्था आहे. निवडणूक निश्चित करते की देशाचे मूलभूत स्वरुप टिकून रहावे. न्यायपालिका निष्पक्ष असावी आणि संसदेमध्ये विविध विषयांवर चर्चा पार पडावी. त्यामुळे देशात निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे, असं राहुल गांधी म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वीडनने दिलेल्या एका रिपोर्टचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की, भारत आता लोकशाही देश राहिलेला नाही.
राहुल गांधी यांनी प्रोफेसर कौशिक बसु यांच्यासोबत चर्चा करताना म्हटलं होतं की, 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चुकीची होती. पण, तेव्हापेक्षा आत देशात अधिक वाईट स्थिती आहे. देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये एका विशिष्ट लोकांचा भरणा झाला आहे'. स्वीडिशच्या संस्थेने रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात सत्ता घेतल्यानंतर देशाच्या लोकशाही स्वातंत्र्यामध्ये घसरण आली आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. देशात निवडणुका होत असल्या, तरी सरकारी संस्था मजबूत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.