Protesters clash with security forces amid heavy deployment in Manipur; vehicles and structures set on fire as curfew and internet shutdown are enforced to curb violence.
esakal
देश
Manipur Violence: मणिपूर पुन्हा पेटले! अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसा, आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; इंटरनेट बंद, संचारबंदी लागू
Manipur Violence : मैतई आणि कुकी-जो गटांमधील वांशिक हिंसाचारात २६० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुख्यंमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार उसळला, त्यानंतर प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आणि पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घातली.पोलिसांनी मेतेई संघटनेच्या अरामबाई टेंगगोल गटाच्या सदस्यांना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री हिंसाचार उसळला. निदर्शकांनी रस्त्यावर आग लावली, बसेस पेटवल्या आणि तोडफोड केली. त्यानंतर हिंसक संघर्ष सुरू झाला.

