नवी दिल्ली : ‘‘ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू असून सैन्य दलांनी अहोरात्र आणि या संपूर्ण वर्षभरात अत्यंत सावध राहायला हवे,’’ असे प्रतिपादन सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी केले..‘भारताचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आणि देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हवाई क्षेत्रातील सामर्थ्य’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात जनरल चौहान बोलत होते. आगामी काळात भारतीय सैन्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि विद्वान लोकांची युद्धासाठी गरज भासणार आहे, असे प्रतिपादनही चौहान यांनी यावेळी बोलताना केले..‘‘युद्धामध्ये उपविजेता कोणी नसतो त्यामुळे सैन्याने कायम अत्यंत सावध राहणे आणि कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईसाठी सदैव सिद्ध राहणे आवश्यक आहे,’’ असेही ते म्हणाले..Rajasthan News: शाळेची इमारत कोसळून पिपलोदीत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; २८ विद्यार्थी जखमी, संपूर्ण झालावाड जिल्ह्यात हळहळ.आगामी काळात युद्धक्षेत्राची वाढती व्याप्ती लक्षात घेत, संरक्षण दलांना माहिती-तंत्रज्ञान आणि अत्यंत विद्वान योद्ध्यांची आवश्यकता भासणार आहे, असेही जनरल चौहान यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे शस्त्राबरोबर शास्त्राचा(आधुनिक तंत्र आणि युद्धनितीबाबतचे ज्ञान) अभ्यास करण्याचीही आवश्यकता आहे, असेही सरसेनाध्यक्ष चौहान यांनी यावेळी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.