नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) घटकपक्षांना मिळालेल्या खातेवाटपावर विरोधकांनी टीका केली असून घटक पक्षांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
गेल्या रविवारी मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी रात्री मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आहेत. यात महत्त्वाची सर्व खाती भाजपने आपल्याकडे राखल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थ, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण व गृह या चार महत्त्वाच्या खात्यांशिवाय महत्वाचे कृषी, भूपृष्ठ वाहतूक, जलशक्ती, शिक्षण, वाणिज्य, आदिवासी विकास,रेल्वे, दूरसंचार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, कोळसा व खाण ही सर्व मंत्रालये भाजपने आपल्याकडे राखले आहे.
महत्त्वाच्या खात्यांपैकी नागरी उड्डयन मंत्रालय टीडीपीचे के. आर. नायडू व जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग ही मंत्रालयच घटकपक्षांच्या ताब्यात आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या जेडीयूचे लल्लन सिंग यांना पंचायती राज व लोजपचे चिराग पासवान यांच्याकडे कमी महत्त्वाची अन्न प्रक्रिया उद्योग खाते दिले आहे. या खातेवाटपावरून भाजपचा मंत्रिमंडळावर पूर्ण प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या संचार विभागाचे प्रमुख खासदार जयराम रमेश यांनी संसदीय कामकाज मंत्रिपद किरेन रिजीजू यांच्याकडे दिल्यावर टीका केली आहे. गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे लोकसभेचे कामकाज सुरू राहिले आहे. त्यात काही बदल व्हावा, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु ‘इंडिया’ आघाडीचे नेते लोकसभा व राज्यसभेत लोकांचे प्रश्न उठविण्याचे काम करणार आहे. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सत्तेच्या वर्तुळात घटकपक्षांना चांगले स्थान मिळालेले नाही. भाजपने त्यांच्यासाठी चांगली खाते रिकामे ठेवली नसल्याचे म्हटले आहे.
‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी घटकपक्षांना भाजपने दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. आघाडीमध्ये घटकपक्षांना सन्मान द्यायला हवा होता. काँग्रेसचे नेते कार्ति चिदंबरम यांनी ‘सेम ओल्ड, सेम ओल्ड’ असे म्हणत तरुणांना या मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी नव्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून भविष्यात खूप काही पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मंत्रिमंडळ वाटपावरून भाजपला केंद्रातील सरकार पाच वर्षे चालवायचे नसल्याचे स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत टीका केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.